कोकणाला भूकंपाचा धोका




नैसर्गिक आपत्ती:  

  पूर, भूस्खलन,  सारखे नैसर्गिक आपत्तीजनक  घटना कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा , सांगली येथे अलीकडच्या काळात वाढत आहेत. 

  कोकण किनारपट्टी, प्रामुख्याने समुद्र किनारी असल्याने येथील जमिनीचा थर पातळ असतो. कोकण पूर्णतः सहयाद्री पर्वत  रांगांनी वेढलेला असून हे सर्व डोंगर भूकंप उद्रेकामुळेच निर्माण झाले आहेत. हिमालय पर्वतच्या रांगा  सुद्धा  भूकंप वर्गीकरण नुसार अती तीव्र झोन मध्येच येतात.

  पूरग्रस्त परिस्थिती ही कोकण भागासाठी नवीन नाही पण अति प्रमाणात जमीनच उत्खनन, मायनिंग सारखे प्रकल्प या मध्ये भर टाकण्याचे काम करतात आणि पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचं कार्य करत आहेत.

  

  


 कोकण, लातूर, बीड, आणि  मुंबई, पालघर सारखे जिल्हे अती तीव्र भूकंप  वर्गीकरणात येतात 

  ज्या ठिकाणी बेसाल्ट खडक अधिक प्रमाणत आहे तेथे भूकंपाचे तीव्र झडके येण्याचे प्रमाण अधिक असते असे तज्ञांचे मत आहे.

   डेक्कन ट्रॅप बेसाल्टिक रॉक, डोलेराइट डाईक रॉक, सामान्यतः गोवा समुद्रकिनाऱ्यांवर आढळतो, जो पश्चिम घाटांच्या कोंकण प्रदेश पट्ट्यात स्थित आहे. 

  युनेस्को जैवविविधता हॉट स्पॉटपैकी एक, संपूर्ण डेक्कन ट्रॅपचा एक प्रमुख भाग आहे आणि कोंकण प्रदेश बनलेला आहे 

   हे खडक आता भारतीय शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात एक दुर्मिळ, विकसित बहुभुज स्तंभ बेसाल्ट रचना शोधली आहे. स्तंभीय रचनांसह नव्याने शोधलेला बेसाल्ट प्रवाह 65.6 दशलक्ष वर्ष जुन्या पन्हाळा निर्मितीचा भाग आहे, जो डेक्कन ट्रॅप्सच्या सर्वात अलीकडच्या काळातला आहे 

  सुधारित मर्कल्ली स्केलनुसार भूकंपाच्या झोनची तीव्रता झोन II (कमी तीव्रतेचा झोन), झोन III (मध्यम तीव्रता झोन), झोन IV (गंभीर तीव्रता झोन) आणि झोन V (अती तीव्रता क झोन) म्हणून वर्गीकृत केली .आहे

 रायगड, रत्नागिरी आणि गोव्या पासूनची समुद्र किनारपट्टी ही गंभीर  तीव्रता झोन मध्ये मोडते.नैसर्गिक आपत्ती टाळता येत नाही.  

 वास्तविक पाहता पूर, भूस्खलन आणि भूकंप हे  कोकणा साठी धोक्याचे चिन्ह आहेत. 

Comments

Popular posts from this blog

Safeguarding Devotees and Wildlife: The Heroes Behind the Scenes at Chhatrapati Shivaji Maharaj's Grand Coronation Ceremony"

Delays in Road Construction Pose Threat to Villagers at Ladavali bridge:Raigad Fort Road

Illiteracy, Ignorance, and Illnesses: The Plight of Katkari Villages in Raigad